दोन जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी
वर्धा : माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघे गंभीर जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या अपघातात हंसराज अहीर सुखरूप आहेत.
वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. ताफ्यातील वाहन कंटेनरला धडकले त्यामुळे हा अपघात झाला. जखमींना तात्काळ नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. समोर अचानक आलेल्या माकडाला वाचवण्यासाठी कंटेनरच्या चालकाने ब्रेक लावला. मात्र यामुळे मागून येणारी सुरक्षा जवानांची गाडी या कंटेनरला धडकली. दोन्ही गाड्यांचा वेग अधिक असल्याने सुरक्षा रक्षकांच्या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या गाडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच सुरक्षा जवान होते. हंसराज अहिर हे समोरच्या गाडीत होते. त्यांची गाडी समोर निघून गेल्याने त्यांचे प्राण वाचले.