महाळुंगे इंगळे – राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता पुणे जिल्ह्यासह चाकण उद्योग पंढरीत दाखल झालेल्या बेघर, भूमिहीन व भाडोत्री नागरिकांना राहण्यासाठी हक्काची सरकारी एक गुंठा जागा तातडीने मिळणार असल्याने बेघर व भूमिहीन नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. भापसे पार्टीचे अध्यक्ष दीपक ताटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षापासून भूमिहीनांना जागा मिळावी, यासाठीच्या आंदोलनाला यश आले आहे.
चांदूस व किवळे या दोन्ही गावच्या ठिकाणी दीपक ताटे यांच्या हस्ते संबंधित सरकारी जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी हजारो बेघर, भूमिहीन नागरिक मोठ्या संख्येने हजर झाले होते. शासनाकडे वारंवार यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने याकडे लक्ष देवून बेघरांना जागा देण्यावर शिक्कामोर्तब केल्याने खेड तालुक्यातील किवळे व चांदूस या ठिकाणची जागा निश्चित करण्यात आली. खेड तालुक्यातून बेघरांची मोठी पदयात्रा काढून प्रत्यक्ष जागेवर जावून दीपक ताटे यांच्या हस्ते संबंधित जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भापसे पार्टीच्या पक्ष प्रवक्त्या जयश्री ताटे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण झाडे, जालिंदर उपाडे, राजू गोरे, गीता सावंत, शिल्पा गायकांबळे, रमेश गालफाडे, धनंजय ताटे, लता गायकवाड, बालाजी खंडागळे, महादेव सुतार आदि उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असुन लवथळेश्वर व विद्यानगर या भागातील ज्या नागरीकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही त्यांना आठ दिवसांत नियमित व सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल.
– गणेश शिंदे, सभापती, जेजुरी
विरोधी पक्षनेते पुणे येथे राहावयास असल्याने त्यांना नागरिकांना दिलेल्या सोई सुविधा माहीत नसतात, त्यांनी अगोदर पुर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. शहराकरीताचा पाणी पुरवठा पुढील आठ दिवसांत केला जाईल, याचे काम सुरू करण्यात आले आहे. 1974 पासुन जेजुरीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी सतत फुटत असते. यापुर्वीच सत्ताधाऱ्यांनी ती बदलणे आवश्यक होते. परंतु, ते काम केले गेलेले नाही.
– वीणा सोनवणे, नगराध्यक्षा, जेजुरी