नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधीवर चांगलाच निशाणा साधला आहे. काँग्रेसने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला विरोध केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा हवाला देत पाकिस्ताने संयुक्त राष्ट्र संघाला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे भारताच्या विरोधात राहुल गांधींचे भाषण वापरले जाते याची काँग्रेसला लाज वाटायला हवी” अशा शब्दात शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
Amit Shah,Home Minister: Congress has opposed abrogation of Article 370.Even today,statement Rahul Gandhi gives is being praised in Pakistan.His statement has been included in Pakistan’s petition at UN.Congress should be ashamed that their statements are being used against India. pic.twitter.com/KkPUAStX4n
— ANI (@ANI) September 1, 2019
मागील संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला. कलम 370 आणि 35 ए हे देशाच्या ऐक्याला बाधा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाने पुन्हा पंतप्रधान केलं. त्यामळे पहिल्याच अधिवेशनात त्यांनी कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणालाच हे जमलं नसतं असं शहा यांनी म्हटलं आहे.
Amit Shah, Home Min: With this decision of removal of #Article370, road for development has opened in J&K.The last nail in the coffin of terrorism has been put,task of integrating J&K with India has been done.Everyone is with govt on this decision but some people are opposing it. pic.twitter.com/gS5EVwyReq
— ANI (@ANI) September 1, 2019
ते पुढे म्हणाले की, कलम 370 हटविण्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाचा मार्ग खुला झाला आहे. दहशतवाद्यांवर दबाव ठेवण्याचं काम केलं जात आहे. काश्मीरला पूर्णपणे भारताच्या सोबत आणलं आहे. सर्व लोक या निर्णयाच्या पाठिशी आहेत मात्र काही जण याचा विरोध करतात. काँग्रेसने कलम 370 हटविण्याला विरोध केला. आजही राहुल गांधी भाषण देतात त्याचं कौतुक पाकिस्तानात केलं जातं. त्यांच्या भाषणाचा उल्लेख भारताच्या विरोधात केला जातो याबाबत काँग्रेसला लाज वाटायला हवी असं त्यांनी सांगितले.