आतापर्यंत चार राज्यांमध्ये 125 जणांचा बळी
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसांपूासन पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत 125 पेक्षा अधिक लोकांचा या पुराने बळी घेतला आहे. केरळमध्ये गुरुवारपर्यंत 55, महाराष्ट्रात 27, गुजरातमध्ये 22, कर्नाटक 24 तसेच इतरही अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
Maharashtra: Incessant rains in the Kolhapur region has led to damage to property; villagers in Shiroli collect water as floodwaters begin to recede. pic.twitter.com/4NS3yYqe5W
— ANI (@ANI) August 11, 2019
हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यातच आजपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा सार्वजनिक मालमत्तेला बसला आहे. तसेच घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लष्कराच्या बचाव पथकांना मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार आहेत. केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून, पूर आणि भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, अजूनही काही राज्यांमध्ये पुराची परिस्थिती म्हणावी तेवढ्या प्रमाणात कमी झाली नाही.