पुणे : विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. सुमारे 40 घरात हे पाणी घुसले असून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने हा प्रकार घडला आहे. रात्रीपासून या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, क्षेत्रीय अधिकारी विजय लांडगे यांनी आज आपतग्रस्तांना भेट दिली. यावेळी शांतीनगर रहिवाशांनी विजय लांडगे घेराव घातला. सकाळपासून केवळ चहा-बिस्कीटच देण्यात आली आहे. नदीचे पाणी दरवर्षी येते यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आपतग्रस्तांनी केली आहे.
दरम्यान, वसाहतीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. शांतिनगरमधील शंभरहून अधिक कुटुंबीयांची जवळील शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.