वांगणी – कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात गेले काही दिवसापासून असणारा पावसाचा जोर अद्याप कायम आहे.त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी नद्यांना पुर आल्याने गावांचा सपंर्क तुटला आहे, तर काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील नेरळदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रुळा खालचा भराव खचला आहे. त्यामुळे मध्ये रेल्वे सिग्नल यंत्रणा ठप्प झाली असून मध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.