कोल्हापूर- गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेल्वेमार्गाला ही बसला आहे. कोल्हापूर- मिरज दरम्यान येणारा रुकडी रेल्वे पुला वरती पाणी आल्यामुळे रुकडी- कोल्हापूर दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रुकडी गावा लगत असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.