मुंबई – भारत अ संघाकडून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला वरिष्ठ संघात परतण्याची आशा होती मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही. यामुळे तो निराश झाला. मात्र याबाबत विचार करून त्याला वेळ वाया घालवायचा नाही गिलने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, रविवारी भारतीय संघाच्या निवडीच्या घोषणेची वाट पाहात होतो आणि मला एखाद्या टीममध्ये घेतील, अशी आशा होती.
निवड न झाल्याने नक्कीच निराश झालो. मात्र मी याबाबत विचार करून वेळ वाया घालवणार नाही. मी निवड समितीवर छाप पाडण्यासाठी धावा बनवणे तसेच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चांगली कामगिरी करत राहीन. पंजाबचा हा युवा फलंदाज वेस्ट इंडिज अ विरुद्ध केलेल्या आपल्या कामगिरीने खुश आहे. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली. यावेळी गिलने सांगितले, माझ्यासाठी आणि संघासाठी ही मालिका चांगली होती. आम्ही ही मालिका जिंकलो. माझ्या मते दोन अर्धशतकांना शतकांमध्ये परावर्तित करायला आवडले असते.