पुणे – खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ-मृदुंग, मनामध्ये विठुरायाला भेटण्याची ओढ घेऊन निघालेल्या वैष्णवांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी घेऊन सासवड येथे विसावली होती. दरम्यान, आज सकाळी साडेसहा वाजता पुन्हा पुढील प्रवासास सुरुवात झाली आहे.सर्व वारकरी शिस्तबद्ध पणे पंढरपूरकडे रवाना होत आहेत. यावेळी भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. पुढील मुक्काम हा जेजुरी या ठिकाणी असणार आहे.