मुंबई – युवासेना अध्यक्ष ‘आदित्य ठाकरे’ यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेनेतील अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले होते की, ‘आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. पण राज्यातील जनतेला तरुण चेहऱ्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल. असे विधान केले होते. मात्र या विधानाच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विटद्वारे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
पेंग्विनचा पण राहुल गांधी संज्या सारखी लोकं नक्की करणार. देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये. https://t.co/zthjulDXGY
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2019
दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे की, ‘पेंग्विनचा पण राहुल गांधी संज्या सारखी लोकं नक्की करणार. देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये.’अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.या ट्विटद्वारे त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्पूर्वी, आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असतांना एका कार्यक्रमात नाव निलेश राणे यांचे नाव ऐकताच ‘अरे बापरे’ अशी प्रतिक्रिया देत त्यांना ओळखपत्र आहे का? अशा शब्दात टीका केली होती.