टॉंटन – भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत क्रिकेट पंडितांनाही चकित केले आहे. या लढतीमध्ये सर्वच आघाड्यांवर भारताची कामगिरी सरस झाली होती. यानंतर पाकिस्तानविरूध्दच्या आजच्या होणाऱ्या सामन्याआधी प्रतिक्रिया देताना फिंचने भारताविरूध्दचा पराभव हा इतिहासजमा झाल्याचे म्हटले आहे.
पुढे बोलताना फिंच म्हटला की, ‘भारताने आम्हाला नुकतेच हरविले असले तरीही आमच्या खेळाडूंचे मनौधैर्य खचलेले नाही. पुन्हा विजयी वाटचाल राखण्याकरिता आमचे खेळाडू उत्सुक झाले आहेत. या सामन्यात झालेल्या चुका पुन्हा घडणार नाही याची आम्ही खबरदारी घेत आहोत. विशेषत: गोलंदाजीत सुधारणा करणार आहोत. भारताला आम्ही शेवटच्या सात आठ षटकांमध्ये आम्ही खूपच धावा दिल्या. या धावा कशा रोखल्या जातील यासाठी आमचा प्रयत्न असेल’ .