कळंबमध्ये रात्रीही ग्रामस्थांचा प्रतिसाद
कळंब – ग्रासलेल्या, व्यापलेल्यांना दिलासा देण्याचं काम मी गेल्या 20 वर्षांत केलंय. आतापर्यंत 813 जनता दरबार भरवले. लोकांचे प्रश्न समजून घेतले, सोडवले. असं काम करणारा मी माणूस आहे. निवडून आलो आणि दिल्लीलाच गेलो असं कधी झालं नाही, असे प्रतिपादन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे केले. तुमचा रात्री उशीरा देखील माझ्यासाठी दाखविलेला उत्साह आणि प्रतिसाद पाहून मी भारावलो आहे, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणूक प्रचारानिमित्त आयोजित या दौर्यात महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.वाजत-गाजत व फटाके फोडून आढळरावांचे स्वागत करण्यात आल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले. याप्रसंगी शरद सहकारी बँकचे चेअरमन देवेंद्र शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती वसंतराव भालेराव, विवेक वळसे पाटील, निलेश स्वामी थोरात, सचिन भोर, देवीदास दरेकर, सचिन बांगर, संतोष डोके, प्रवीण थोरात, उषाताई कानडे, रविंद्र करंजखेले, यशवंत कानडे, संजय थोरात, बाबाजी वर्पे, संतोष भालेराव, कमलेश वर्पे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
15 वर्षे मी निवडून आलो ते गोरगरीब जनतेच्या आशिर्वादाने. मी कोणावर टीका करण्यासाठी उभा नाही तर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उभा आहे.असेच पाठबळ माझ्या पाठीशी ठेवा.
-शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार (शिरूर)