कान्हूर मेसाईच्या विद्याधाममध्ये स्वागत कमानीचे लोकार्पण
शिक्रापूर – आता ज्ञानाच्या कक्षा विस्तारत कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग येत असून देशभरात युवा पिढी सक्षम व्हावी यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले आहे. या बदलांना सामोरे जाताना शिक्षक व विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे सहकारमंत्री दिलीप वळसे यांनी सांगितले.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उदघाटन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करत स्वागत कमानीचे लोकार्पण करण्यात आले आहे. योवळी ते बोलत होेते.
माजी प्राचार्य अनिल शिंदे व मोहन पुंडे यांच्या प्रयत्नातून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विकास भाग निधीतून देण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटनप्रसंगी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर,
विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, संचालक सदाशिव पुंडे, भास्कर पुंडे, रोहिदास ढगे, राजेंद्र ननवरे, लहू तळोले, बाबुराव दळवी, राष्ट्रवादी किसान सेलचे सुधीर पुंडे, बबन शिंदे, उद्योजक अमोल पुंडे, अविष्कार ननवरे, प्राचार्य किसन पांढरे, माजी प्राचार्य अनिल शिंदे, माजी उपसरपंच दिपक तळोले, उद्योजक प्रमोद वाघ यांसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य अनिल शिंदे यांनी यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे यांनी आभार मानले.