नवी दिल्ली : देशात सध्या स्वयंघोषित धर्मगुरु बागेश्वर धमाचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या चमत्काराला अंनिसचे शाम मानव यांनी आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र शास्त्री हे चांगलेच चर्चेत आले. त्यांनी केलेल्या चमत्काराला आता अनेकांनी आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान,या प्रकरणात आता योगगुरू रामदेव बाबा यांची एंट्री झाली आहे. त्यांनी देशात चमत्काराच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले आहे.
पंतंजली योगपीठात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमा दरम्यान रामदेव बाबा बोलत होते. याठिकाणी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “देशात अनेक लोकांकडून सनातन परंपरेशी संबंधित महापुरुषांविरूद्ध अपमानास्पद वक्तव्य केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जे लोक अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत ती अंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत त्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचेही म्हटले.
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रामदेव बाबा यांनी,” देशात सध्या चमत्काराच्या नावाखाली देशात लोकांची दिशाभूल केली जात असल्याची कबुली दिली. तसेच भारत भौतिक वास्तवाचा आदर करतो. त्याच्या संस्कृतीत आणि धर्मात ढोंगीपणाला स्थान नाही. पण भौतिक शास्त्र असेल तर अध्यात्मिक शास्त्रही आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही,असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमादरम्यान,रामदेव बाबा यांनी’पाकिस्तानवर निशाणा साधत,’ते सध्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. तसेच लवकरच पीओके, सिंध आणि बलुचिस्तान हे चार भागांमध्ये विभागले जाऊन ते सर्व भारतात विलीन आपला देश होऊन महासत्ता बनेल”,असे त्यांनी यावेळी म्हटले.