मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्यपालांच्या विधानावरून थेट महाराष्ट्र सरकारवर हल्लबोल केला आहे
अशातच मनसे नेते वसंत मोरे यांनी सुद्धा राज्यपालांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. याच नाव भगतसिंग ऐवजी कळीचा नारद पाहिजे होते…आमच्या राजांना एकेरी ना तर मग तू कोण लागून गेलाय ? असा प्रश्न त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत विचारला आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती अशा प्रकारे बेताल वक्तव्य करत आहे. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं केली होती. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले किंवा छत्रपती शिवाजी महाराज या महापुरषांना आपण आदर्श मानतो. अशा व्यक्तींच्या बाबतीत राज्यपाल महोदय अशी बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असेही ते म्हणाले आहे.