T20 World Cup – पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-२० विश्वचषकाचा फायनल सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कारण भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. तर सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दुसरीकडे भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघांनी आपापले सेमीफायनल सामने जिंकले तर हेच दोन्ही संघ फायनलमध्ये खेळताना दिसणार आहेत.
“तू माझ्यापेक्षाही जास्त वेगाने खेळत आहेस”, एबी डिव्हिलियर्सकडून सूर्यकुमारचे कौतुक!
दरम्यान, पाकिस्तानी संघाची खराब कामगिरी सुरु होती, तेव्हा शोएब अख्तरने पाकिस्तानसह भारतालाही टोमणे मारले होते. पाकिस्तान ( T20 World Cup ) सुपर-१२ नंतर घरी जाईल तर भारतही सेमीफायनल खेळून घरी जाईल, असे वक्तव्य अख्तरने केले होते. मात्र आता तो त्यानेच केलेल्या वक्तव्यांना किनारा देताना दिसत आहे. त्याचबरोबर दोन्ही संघ स्पर्धेतून अपयशी होऊन घरी जातील असे पाहणाऱ्या अख्तरने आता या दोन्ही संघांनी फायनलमध्ये आमने-सामने पाहायचे आहे, अशी इच्छा देखील व्यक्त केलीय.
शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “आता पाकिस्तान संघ सेमाफायनलमध्ये काय करतो ते पाहू. नाहीतर असे व्हायला नको की, भारत एका विमानाने परत येत आहे आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानही दुसऱ्या विमानाने घरी परत येत आहे. मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनल पहायची आहे. तुम्हाला माहिती आहे की असे झाल्यास सर्वात जास्त मजा कोणाला येईल? त्याचबरोबर भारत-पाकिस्तान सामना झाल्यास आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्सना याचा सर्वाधिक फायदा होईल, असेही अख्तरने म्हटले आहे.
पाकिस्तान संघाची कामगिरी टी-२० विश्वचषकाच्या ( T20 World Cup ) पहिल्या दोन सामन्यांमध्ये अत्यंत खराब राहिली होती. आगोदर भारत आणि नंतर त्यांना झिम्बाब्वे पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर पाकिस्तान संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडलायचे मानले जात होते, मात्र आफ्रिकेसोबत नेदरलँड्सने केलेला मोठा उलटफेर पाकिस्तानसाठी जीवनदान ठरला. कारण आफ्रिकेचा नेदरलँड्सने पराभव केल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशला हरवत सहज सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.