नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या 2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयावर हल्ला चढवला. त्यांनी म्हटले आहे की, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे पण पंतप्रधानांनी मात्र हे अपयश मात्र अजून मान्य केलेले नाही.
उद्या 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीच्या निर्णयाला सहा वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका करताना आज बाजारात मोठ्या प्रमाणावर ज्या चलनी नोटा वाढल्या आहेत. त्या बातम्यांचा दाखलाही दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, बाजारातील रोख रकमेचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. पण आज नोटबंदीच्या सहाव्या वर्षात बाजारात 30 लाख 88 हजार कोटी रुपयांच्या चलनी नोटा आहेत हा एक विक्रम आहे. नोटबंदी सन 2016 मध्ये करण्यात आली आणि त्यावर्षी बाजारात जितक्या प्रमाणात नोटा वापरात होत्या त्या तुलनेत सध्या वापरात असलेल्या नोटांचे प्रमाण 72 टक्क्यांनी अधिक आहे आणि तो नोटबंदीच्या निर्णयाचे अपयश अधोरेखित करणारा आहे.
सत्तारांच्या विधानानंतर रोहित पवार संतापले, म्हणाले “आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या…”
नोटाबंदीमुळे देशाला काळ्या पैशापासून मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात या निर्णयामुळे व्यवसाय नष्ट झाले आणि नोकऱ्या उद्ध्वस्त झाल्या. पंतप्रधानांचा हा कथित मास्टरस्ट्रोक फेल गेला आहे, असेही खर्गे यांनी म्हटले आहे, पण पंतप्रधानांनी हे अपयश मान्य केलेले नाही, असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.