मुंबई – राज्यातील 1,165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान पार पडले असून आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 60 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.
अंधेरी पोटनिवडणूक: भाजप उमेदवार अर्ज मागे घेणार की नाही? उद्या होणार स्पष्ट
भंडारा जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 61.39 टक्के मतदान झाले होते. तर नंदुरबारमध्ये 60. 09 टक्के मतदान झाले आहे. तसेच रायगडमNandurbarध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.
दरम्यान, राज्यात आज ग्रामपंचायतीसंह सरपंचपदासाठी सकाळी सात वाजता मदतानाला सुरुवात झाली तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान पार पडले. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.