साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी युवा खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या मालिकेवेळी भारतीय संघाचे मुख्य खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याने युवा खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आली होती. मात्र या युवा संघात पृथ्वी शॉला ( Prithvi Shaw ) संधी देण्यात आली नव्हती. याबाबत त्याने सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली होती. त्यावेळी अनेक जणांनी त्याचे समर्थन केले तर काहींनी त्याच्यावर टीका केली होती. मात्र सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वीची ( Prithvi Shaw ) बॅट धावांचा पाऊस पडत आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. पृथ्वीने ( Prithvi Shaw ) शुक्रवारी राजकोटमध्ये आसाम विरुद्ध मुंबई सामन्यात टी-२० फॉर्मेटमधील पहिले शतक झळकावले. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने ६१ चेंडूत १३ चौकार आणि ९ षटकारांसह १३४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली.
T20 World Cup | शेवटी ठरलं! बुमराहच्या जागी ‘हा’ खेळाडू जाणार ऑस्ट्रेलियाला
पृथ्वी शॉच्या ( Prithvi Shaw ) दमदार कामगिरीच्या बळावर सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईने ३ गडी गमावून २३० अशी मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात आसामचा संघ १६९ धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबईने या सामन्यात ६१ धावांनी बाजी मारली.
End of a great knock from captain Prithvi Shaw, 134 runs from just 61 balls including 13 fours and 9 sixes, he led Mumbai from front with bat. pic.twitter.com/J5cbKy5Pyu
— Johns. (@CricCrazyJohns) October 14, 2022
मागील काही दिवसांपासून पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw ) चांगल्या लयीत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने न्यूझीलंड ए संघाविरुद्ध चांगल्या खेळी खेळल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्याने आपले फलंदाजीतील कौशल्य दाखवले आहे. पृथ्वीच्या ( Prithvi Shaw ) शतकी खेळीच्या बळावर मुंबई संघाने सामन्यात विजय तर मिळालाच मात्र आता मुंबई संघाला या स्पर्धेचा संभाव्य विजेता मानलं जात आहे.