Pankaja Munde : देशातील राजकारणात वंशवाद हा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्वच राजकीय नेते गांधी घराण्यावर मोठ्या प्रमाणात टीका करतात. कारण तसे पाहायला गेले तर काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या पदावर एकाच घराण्यातील लोक काम करताना दिसतात. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीत त्याप्रमाणात वंशवाद पाहायला मिळत नाही. दरम्यान भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी राजकारणातील वंशवादावरून मोठं वक्तव्य केले आहे.
सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच काँग्रेसवर किंवा विरोधकांवर वंशवादावरून टीका केली जात आहे. त्याचे एक ताजे उदाहरण म्हणजे बारामती येथे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा. कारण बारामतीत बऱ्याच काळापासून पवार घराण्याची सत्ता कायम आहे. त्यामुळे पक्षाला बळकटी देण्याच्या प्रयत्न भाजपकडून याठिकाणी केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडा निमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” या कार्यक्रमात पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) बोलत होत्या.
यावेळी मुंडे म्हणाल्या की, मोदींना देशातील राजकारणात पसरलेला वंशवाद संपवायचा आहे. राजकारणातील वंशवादात माझाही समावेश होतो. मात्र मला कोणीही संपवू शकत नाही. मोदीजींनी ठरवले तरी देखील ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. ( Pankaja Munde has a statement about Prime Minister Narendra Modi ) माझ्यासाठी जनतेच्या मनात प्रेम आहे त्यामुळे मोदी देखील असं करू शकणार नाहीत. असेही पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यावेळी बोलताना म्हणाल्या.
तसेच यावेळी बोलताना खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यावं अशीही मागणी केली आहे. मागच्या पाच वर्षात पालकमंत्री असताना पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी बीड जिल्ह्याचा मोठा विकास केला आहे. त्यामुळे आता पुन्हा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवल्यास जिल्ह्याचा आणखी विकास नक्कीच होईल. असेही डॉ. प्रीतमम मुंडे यावेळी म्हणाल्या.