नागपूर : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. भारतीय संघाच्या विजयाव्यतिरिक्त तो सामना इतर कारणांसाठीही मोठ्या प्रमाणात चर्चेत राहीला. कारण सामन्याच्या सुरुवातीला पावसाचा व्यत्यय आल्याने सामना फक्त 8-8 षटकांचा खेळवण्यात आला. या समान्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार सगळ्यांनाच माहिती होते. भारताने नाणेफेक जिंकली अन् लगेच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने भारताला निर्धारित 8 षटकांत 91 धावांचे लक्ष्य दिले. भारताने कर्णधार रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला.
हा सामना सुरू होण्याअगोदर मैदानात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. विराट कोहली आणि हर्षल पटेल यांना पाहून चाहते चक्क आरसीबी.. आरसीबी असा जल्लोष करू लागले. यावर विराटने चाहत्यांना असा इशारा केला ज्याने अनेक भारतीयांची मने जिंकली आहेत.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दूसरा सामना नागपुरात खेळला गेला. सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीला आणि हर्षल पटेलला पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहत्यांनी आरसीबी…आरसीबी असा जयघोष सुरू केला. मात्र ही बाब विराटला अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने चाहत्यांना इशारा करत भारतीय संघाची जर्सी दाखवली. यावरून विराट चाहत्यांना असं सांगण्याचा प्रयत्न करत होता की, “तो सध्या आरसीबीसाठई नाही तर इंडियासाठी खेळत आहे. आरसीबी नाही, इंडिया म्हणा. त्यामुळे त्याचा हा अंदाज क्रिकेट चाहत्यांना चांगलाच आवडला.
Keeping India over RCB. That’s King Kohli for you 🇮🇳❤️ pic.twitter.com/DrKpPigvkH
— Pari (@BluntIndianGal) September 24, 2022
विराटच्या कामगिरीबाबत अजूनही चिंताच
विराट कोहलीने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ हा मागील तीन वर्षात पहिला असेल. कारण त्याने त्याचे 70 वे शतक हे 2019 मध्ये साकारले होते. त्यानंतर त्याला 71 वे शकत करण्यासाठी तीन वर्षांची वाट पहावी लागली. एशिया चषकातील अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात विराटने 122 धावांची खेळी खेळली आणि 71 व्या शतकाला अखेर गवसणी घातली. महत्वाचं म्हणजे टी-20 प्रकारात विराट कोहलीने पहिल्यांदाच शतकीय पारी खेळली आहे. मात्र यानंतर ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या दोन सामन्यात विराटला खास कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात 2 आणि दुसऱ्या सामन्यात 11 धावा करून तो बाद झाला. त्यामुळे अजूनही त्याच्या कामगिरीबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे.