मुंबई – पावसाळी अधिवेशनात मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा अखेर आज मृत्यू झाला आहे. अधिवेशनाच्या चौथ्या उस्मानाबादमधील शेतकरी दिवशी सुभाष देशमुख यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांना उपचारांसाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज अखेर मृत्यू झाला.
सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली.
या दुर्घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे जे रुग्णालय येथे उपचार सुरू होते. आज 29 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. सागर गुंडेवाल यांनी त्यांना 11:55 वा. मयत घोषित करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन सुभाष देशमुख यांची भेट घेतली होती. त्यांच्या तब्बेतीची चौकशी करत त्यांची अडचण जाणून घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल पत्र लिहीत आत्महत्या न करण्याचे भावनिक आवाहन केले होते. (A farmer who attempted self-immolation in front of the ministry during the monsoon session died during treatment)