नाशिक – मला बोलण्यास भाग पाडू नका. मी मुलाखत दिली तर राज्यात नव्हे; देशात भूकंप होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यातील कटूता वाढत चालल्याचे सूचित होत आहे.
ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकाला प्रदीर्घ मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी शिंदे आणि बंडखोर गटावर टीकेची झोड उठवली. ठाकरे यांनी बंडखोरांनी विश्वासघात केल्याचे म्हणत त्यांचा उल्लेख गद्दार म्हणून केला. त्या टीकेला शिंदे यांनी मालेगावमधील सभेत बोलताना प्रत्युत्तर दिले.
शिवसेना आणि भाजप युतीने एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवली. जनतेने युतीला कौल दिला. मात्र, युतीचे सरकार स्थापन करण्याऐवजी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेऊन सरकार स्थापण्यात आले. मग, विश्वासघात कुणी केला हा विचार करण्याची आवश्यकता आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला थारा दिला नाही. पण, मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी त्या पक्षांना जवळ करण्यात आलं. मग, विश्वासघात कुणी केला, असा सवाल शिंदे यांनी केला.
तुरुंगवास टाळायचा असेल तर जरा जपून करा फेसबुकचा वापर !
शिवसेना अशीच मोठी झाली आहे का? बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांमधून शिवसेना मोठी झाली. पक्षवाढीसाठी कित्येक वर्षांपासून आम्ही मेहनत घेत आहोत. त्यासाठी वेळेची-काळाची पर्वा केली नाही. दिवस-रात्र बघितली नाही. मी फार काही बोलणार नाही. पण, समोरून जस-जसे तोंड उघडले जाईल; तस-तसे मलाही बोलावे लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जे घडले त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर बोलेन, असे सूचक वक्तव्यही शिंदे यांनी केले.
भाजपला रामराम करून तृणमूलमध्ये गेलेल्या आमदाराला ईडी नोटीस