मुंबई – राज्याच्या राजकारणात कधी नव्हे ती अशी अस्वस्थता आहे. सरकार कोसळणार अशा बातम्या येत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने कसलीही तमा न बाळगता कामाचा धडाका सुरू ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऍक्शन मोडमध्ये असून अनेक वर्षांची मागणी आज पूर्ण झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर कऱण्याचा निर्णय घेतला आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव कऱण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेले हे निर्णय मास्टरस्ट्रोक मानले जात आहे.
या व्यतिरिक्त मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र ही मागणी मान्य होत नव्हती. आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.