मुंबई – राज्यात बुधवारी आणखी 3957 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आज दिवसभरात एकूण 3696 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे.
राज्यात आज सात करोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,98,817 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.
त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.82 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात आज एकूण 25,735 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 11,844 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5655 सक्रिय रुग्ण आहेत.