पालघर – ओबीसी समाजाच्या हितासाठी आपल्याला काम करायचे होते त्यामुळे मी पुर्वी शिवसेना सोडून माझ्या राजकीय करिअरचा धोका पत्करला होता असे महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी समाज हक्क संघर्ष समितीने पालघरमध्ये काढलेल्या मोर्चानंतर आयोजित सभेला संबोधित करताना भुजबळ यांनी हे विधान केले.
ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. त्यांच्या फायद्यासाठी मी माझी राजकीय कारकीर्द धोक्यात घालून (शिवसेनेतून) बाहेर पडलो,असे ते म्हणाले.
भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती, मात्र 1991 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भुजबळ त्यांच्या पक्षात गेले.