मुंबई – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आले नाही. दरम्यान भाजपनेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकावर मेट्रो प्रकल्पावरुन खोचक टोला लगावला आहे.
निलेश राणे म्हणाले की, ”राज्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, 2019 पासून आलेले संकट दूर व्हावे, ठाकरे परिवार सत्तेत बसू नये ही प्रार्थना आहे. मेट्रोसाठी पैसा उभा केला फडणवीस सरकारने, जे काम झाले त्या सरकारमध्ये झाले. यांनी एक रुपया दिला तरी जाहीर करावा. हे कपटी सरकार आहे. क्रेडीट आणि कंत्राट स्वतः खायचे, हे दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचे मूल म्हणतात, त्यांचे कुठे आहे.” असा टोला राणे यांनी यावेळी ठाकरे सरकारवर लगावला आहे.
उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. आम्हाला या सरकारमध्ये अजिबात रस नाही, हे कर्माने मरणार आहेत. यांचे कुठे काही पटत नाही. हे दरोडे खोरांचे सरकार आहे. यांना राज्याची चिंता नाही. असे राणे म्हणाले आहेत.