मुंबई – भारताच्या बॅडमिंटनपटू लक्ष्यसेन याने पदार्पणातच इंडिया ओपन बॅडमिंटन या सुपर ५०० मालिकेतील स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्याने आज सिंगापूरच्या जगज्जेत्या लोह कीन येवू याचे आव्हान मोडित काढले. दुहेरीतही भारताच्याच सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी विजेतेपद मिळविले.
२० वर्षीय लक्ष्यने पाचव्या मानांकित लोहचे आव्हान ५४ मिनिटात २४-२२, २१-१७ असे मोडून काढले. दुहेरीत सात्विक आणि चिराग जोडीने तीनवेचत्या जगज्जेत्या मोहंमद एहसान-हेंड्रा सेटिआवान या इंडोनेशियाच्या जोडीचा ४३ मिनिटांत २१-१६, २६-२४ असा पराभव केला. दुहेरीत भारतात विजेतेपद मिळविणारी सात्विक-चिराग ही पहिली भारतीय जोडी ठरली.
लक्ष्यचे सुपर ५०० मालिकेतील पहिले विजेेतपद
इंडियाओपनमध्ये जगज्जेत्या लोह किन येवूवर मात
दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग शेट्टी विजेते
दुहेरीत प्रथमच भारतीय जोडीचे विजेतेपद