नवी दिल्ली – दिल्लीतील सत्तेसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य समजलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणूक पुढील लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण जोर लावला आहे. रविवारी योगींनी भाजपच्या विजयाबाबत वक्तव्य केलं होतं. मात्र त्यांचा दावा खोडून काढत भाजपला ५० जागा जिंकता आल्या तरी खूप झालं, अस विधान एका बड्या नेत्यांन केलं आहे.
सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी भाजपसह योगी आदित्यनाथ सरकारवर कडाडून टीका केली. पूर्वांचल भागात ओमप्रकाश राजभर यांचा मोठा प्रभाव असून, भाजपची येथून पिछेहाट होताना दिसत आहे. मात्र राजभर यांनी आगामी निवडणूक आपण समाजवादी पक्षासोबतच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र तरी भाजप राजभर यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ओमप्रकाश राजभर म्हटलं की, उत्तर प्रदेशात भाजपला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झालं. पूर्वांचलमधील बलिया, मऊ, आझमगड आणि मिर्झापूर या जिल्ह्यांत भाजपचा दारुण पराभव होणार आहे. येथील शेतकरी शेतात दंडुके घेऊन उभे आहेत, असा दावाही राजभर यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान आगामी निवडणुकीनंतर अखिलेश यादवच मुख्यमंत्री होतील. भाजपचं हिंदुत्व नकली असून त्यांना व्यापारी देखील कंटाळल्याचे राजभर यांनी म्हटलं. तसेच आपण अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री नक्की होऊ असंही त्यांनी नमूद केलं.