नवी दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश राज्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी पुन्हा एकदा या राज्यात घडलेल्या एका घटनेमुळे देशभरात इथल्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या बेरोजगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आली असल्याची घटना घडली आहे.
शनिवारी, रात्री बेरोजगार विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव करण्यासाठी लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लखनऊमध्ये शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या जवळपास एक हजार बेरोजगार तरुणांकडून मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले होते. त्याचवेळी पोलीस दाखल झाले. त्यांनी या बेरोजगारांना अटकाव केला.
भाजपा के राज में भावी शिक्षकों पर लाठीचार्ज करके ‘विश्व गुरु’ बनने का मार्ग प्रशस्त किया जा रहा है।
हम 69000 शिक्षक भर्ती की माँगों के साथ हैं।
युवा कहे आज का ~ नहीं चाहिए भाजपा#भाजपा_ख़त्म pic.twitter.com/Ns1FpknRG7
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 4, 2021
मात्र, त्यानंतरही मेणबत्ती मोर्चावर ठाम असणाऱ्या युवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या बेरोजगारांकडून राज्यात 69 हजार शिक्षकांना पुन्हा सेवेत घ्यावे. त्याशिवाय आणखी 22 हजार जागांवर शिक्षक भरती करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
पोलिसांच्या या कारवाईवर विरोधकांनी सरकार टीका केली आहे. भाजपच्या सत्ताकाळात भावी शिक्षकांवर लाठीमार करून ‘विश्वगुरू’ होण्याचा मार्ग प्रशस्त केला जात असल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली.
उत्तर प्रदेशमध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पक्षानेही पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. सरकारने बेरोजगार तरुणांवर लाठीमार करताना एक गोष्टी लक्षात घ्यावी की तरुणांनी भाजपला सत्तेत बसवले. आता त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा तुमच्या सत्तेच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकणार असल्याची टीका खासदार संजय सिंग यांनी केली.