मुंबई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका डावात 10 बळी घेणारा तो जगातील तिसरा आणि न्यूझीलंडमधील पहिला गोलंदाज ठरला आहे.
Only the third bowler to claim all 10 wickets in an innings in the history of Test cricket 🔥
Take a bow, Ajaz Patel! #WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/negtQkbeKd
— ICC (@ICC) December 4, 2021
जिम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर ही कामगिरी करणारा एजाज पटेल तिसरा गोलंदाज ठरला आहे. जिम लेकरने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीच्या एका डावात 10 बळी घेतले होते. त्यानंतर भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात कुंबळेने एका डावात सर्व 10 फलंदाजांना बाद केले होते.
जिम लेकर वि. ऑस्ट्रेलिया 1956
अनिल कुंबळे वि. पाकिस्तान 1999
एजाज पटेल वि. भारत 2021