नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशात लागू केलेले नवीन तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. आज पंतप्रधान मोदी देशवाशियांना संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. गेली अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यास आज यश मिळाले आहे.
LIVE: पत्रकार परिषद https://t.co/KaI5fD8onQ
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 19, 2021
हे कायदे रद्द केल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
काय म्हणाले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात
”केंद्र सरकारच्या भूमिकेमुळं शेकडो शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्याची जबाबदारी सरकारला स्वीकारावीच लागेल. त्यामुळं सरकारनं अन्नदात्याची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.’