नवी दिल्ली – देशात आज 100 कोटी लसवंतांचा टप्पा पूर्ण झाला आहे. देशासह जगभरामध्ये सुरु असलेल्या करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
India achieves the landmark one billion COVID19 vaccinations mark pic.twitter.com/g7DYqcvgjK
— ANI (@ANI) October 21, 2021
दरम्यान, 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यामध्ये ‘औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतल्या सीएसएमटीचा समावेश असणार आहे.
जानेवारी महिन्यामध्ये 16 तारखेपासून भारतात करोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्य यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेल्या या लसीकरणामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व वयोगटांचा समावेश करण्यात आला. आणि याच नियोजनातून आज भारताने 100 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.