सांगली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांनी राज्याचं गृहमंत्रिपद का नाकारले होते हे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. यावर आता खुद्द जयंत पाटील यांनी गृहमंत्रिपद का नाकारले याचा खुलासा केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे आपणाला आर आर आबा पाटील यांनी सांगितले होते, आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. त्यांनतर आपण शुगर मागे लागू नये,अशी भूमिका घेतली असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. सांगलीतील पोलीस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.