मुंबई – भारतातील सर्वात मोठी स्वॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टीसीएसने आपला ताळेबंद जाहीर केला आहे. मात्र या ताळेबंदावर गुंतवणूदार समाधानी नसल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरची विक्री केल्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव आज सहा टक्क्यांनी कमी झाला.
टीसीएस कंपनीच्या नफ्यात 14 टक्क्यांची वाढ होऊन कंपनीने 9624 कोटी रुपयाचा नफा दुसऱ्या तिमाहीत कमावला आहे. मात्र यामुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला असल्यामुळे विक्री झाल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल 16 टक्क्यांनी वाढून 46,867 कोटी रुपये इतका झाला आहे.