पुणे – काल उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांनी तेथील शेतकऱ्यांना चिरडले. लखीमपूर घटनेने केवळ शेतकऱ्यांना नाही तर लोकशाहीलाच चिरडले आहे.
या हिंसक आणि अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी व या शेतकऱी बांधवांना श्रद्धांजली वाहून महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कृषी महाविद्यालय परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.