गुवाहाटी – आसाममध्ये सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याला (अफ्स्पा) आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ते राज्य संबंधित कालावधीसाठी अशांत टापू मानले जाईल. आसाम सरकारने अफ्स्पाला मुदतवाढ देताना त्यामागचे कारण नमूद केले नाही.
आसाममध्ये सर्वप्रथम नोव्हेंबर 1990 मध्ये अफ्स्पा लागू करण्यात आला. त्यानंतर दर सहा महिन्यांनी त्याला मुदतवाढ दिली जात आहे. ईशान्य भारतात आसामबरोबर नागालॅंड आणि मणिपूर तसेच अरूणाचल प्रदेशातील काही भागांत तो कायदा लागू आहे.
अफ्स्पामुळे सशस्त्र दलांना कुठेही मोहिमा राबवण्याचा आणि वॉरंटविना कुणालाही अटक करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे कठोर मानला जाणारा तो कायदा मागे घेण्याची मागणी सातत्याने नागरी संघटना आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून केली जाते.