मुंबई – केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 701 कोटींची मदत जाहीर केली. मात्र ही मदत 2020 साली झालेल्या अतिवृष्टीसाठीची आहे.
महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे 3 हजार 721 कोटींची मदत मागितली होती. त्यापैकी केवळ 701 कोटी मदत देण्यात आली आहे. परंतु ही मदत विद्यमान पूरपरिस्थितीसाठी असल्याचे सांगून जनतेला चुकीची माहिती दिली जात आहे. ही मदत विद्यमान पूरपरिस्थितीची नसून ही 2020 मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची मदत आहे.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७०१ कोटींची मदत जाहीर केली. मात्र ही मदत २०२० साली झालेल्या अतिवृष्टीसाठीची आहे – @maheshtapase@nstomar #LokSabha pic.twitter.com/h4qYb4HrOp
— NCP (@NCPspeaks) July 29, 2021
त्याच काळात महाराष्ट्र सरकारने 3075 कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिली होती. म्हणूनच केंद्राने काल जाहीर केलेल्या 701 कोटींच्या मदतीबाबत सर्वसामान्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये.
भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकांनी कृपया यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे.