आढळराव पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील दौर्याला प्रतिसाद
रांजणी – महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे सदैव जनतेत मिसळणारे नेतृत्व आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून ते पूर्णवेळ लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे लोकांसाठी उपलब्ध असणारे आढळरावच तालुक्याचे प्रश्न केंद्र शासनाच्या पातळीवर मार्गी लावण्यासाठी असावेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी केेले.
आंबेगाव तालुक्यातील विविध गावांतून आढळराव यांचा दौरा झाला. त्यावेळी ठिकठिकाणी जल्लोषात, वाजतगात त्यांचं स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पूर्वाताई वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी सदस्य विवेक वळसे पाटील,
तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, माजी गटनेते देविदास दरेकर, भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष संजय थोरात, युवासेना विस्तारक सचिन बांगर, प्रविण थोरात, रविंद्र करंजखेले, संतोष डोके, निलेश थोरात, अजित चव्हाण, सचिन भोर, जे. डी. टेमगिरे, आंबेगाव महिला आघाडी अध्यक्षा सुषमाताई शिंदे, भैरवनाथ पतसंस्था संचालक महेश ढमढेरे, रूपालीताई भोजणे, केतन पोहकर, नितीन फुटाणे, तेजस मिंडे, आदि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भागडी, वळती, थोरांदळे, जाधववाडी, भराडी, चांडोली, लौकी, चिंचोली, चास, महाळुंगे पडवळ, साकोरे, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, कळंब आदी गावांच्या दौर्यात महायुतीच्या घटक पक्षांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पक्षकार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येत असल्याचे दिसून आले.