भूक मंदावणे याला अग्निमांद्य असेही म्हटले जाते. भूक मंदावण्यासाठी चुकीची जीवनशैली आणि शारीरिक अथवा मानसिक ताणही कारणीभूत असल्याचे आढळून येते. निसर्गचक्राच्या विरुद्ध जाऊन आपण काही करू पाहिले तर त्याचा अनिष्ट परिणाम हा भुकेवर होतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
भूकच लागत नसल्यास…
-एक चमचा हिंगाष्टक चूर्ण जेवणापूर्वी घ्यावे.
-आल्यावर लिंबू पिळून ठेवा. त्यावर काळे मीठ घाला. थोड्या वेळाने खावे. अपचन, बद्धकोष्ठ यामध्ये उपयोगी पडू शकते.
-वेलची सालीसह कुटून पाण्यात टाकावे. ते उकळून प्यावे. उचकी थांबते.
-पुदिना 20 पाने, प्रत्येकी दहा ग्रॅम बडीशेप, खडीसाखर काळी मिरी एकत्र वाटा. रस गाळून घ्या. उचकी सुरू झाल्यावर हे दोन थेंब एक ग्लास पाण्यात घालून प्या.
डोके दुखत असल्यास…
-वेखंड उगाळून डोक्याला लावावे.
-सुंठ व मिरी चूर्ण खावे.
-शुद्ध तुपाचे 2-4 थेंब नाकात सोडावे. अर्धशिशीचा त्रास कमी होतो.
-अर्ध-डोके दुखत असेल तर पांढरा कांदा खिसून त्याचा लेप लावावा.
-पेढा किंवा गोड खाल्ल्यानेही कमी होते. विशेषतः पहाटे पेढा खावा.
-माक्याच्या पानाच्या रसात काळी मिरी वाटून, तो लेप लावा.
-चंदन उगाळून, त्यात लसणाची पेस्ट घालावी. ते कपाळाला लावावे.
-माक्याच्या पानाचा रस काढावा, त्यात काळी मिरी वाटून लेप द्यावा.
-चंदन व लसूण उगाळून ते एकत्रित करून त्याचा लेप कपाळावर लावावा.
-चार वेलची, सालीसहित कुटून पाण्यात मिसळून ते पाणी उकळावे, हे पाणी प्यायल्याने उचकी थांबते.
-पुदिन्याची 20 पाने, प्रत्येकी दहा ग्रॅंम बडीशेप, खडीसाखर आणि काळी मिरी घेऊन एकत्र वाटा. त्याचा रस फडक्याने गाळून घ्या. उचकी लागल्यावर या रसाचे 2-3 थेंब पेलाभर पाण्यात टाकून प्यायल्यास उचकी बरी होईल.
एका बशीमध्ये आल्याचा कीस घेऊ न त्यावर ताजे टवटवीत लिंबू पिळावे व त्यावर काळे मीठ (र्सैधव) टाकावे आणि त्यावर वाटी पालथी घालावी. थोड्या वेळाने रस सुटेल, तो थोडा थोडा चाखावा आणि आले चावून खावे असे केल्याने अपचन, बद्धकोष्टता या सर्व तक्रारी दूर होतात.