पाकिस्तानशी भारताला मैत्री का हवी?
ओटावा, ता. 20 – भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत ते केवळ ध्येयवादाच्या दृष्टीने नव्हेत तर व्यवहाराच्या दृष्टीनेही असे चांगले संबंध असणे इष्ट आहे म्हणून.
शिवाय उभय देशांपुढे आर्थिक विकासाचे समानप्रश्न आहेत. पाकिस्तानने आपली हटवादी भूमिका सोडली तर त्यामुळे पाकिस्तानचाही फायदा होईल.
राष्ट्राराष्ट्रांतील विषमतेने भवितव्य धोक्यात
ओटावा – राष्ट्राराष्ट्रांतील तीव्र विषमतेमुळे जागतिक भवितव्य धोक्यात आले आहे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले. आश्चर्यकारक गतीने विज्ञान व तंत्रज्ञान यांची घौडदौड चालू असता काही देशांची विचारप्रणाली मात्र सनातनी राहावी हा जगातील मोठा विरोधाभास आहे.
मतदान पत्रिका पंच करावी
लखनौ – भारतातील निवडणुका निःपक्षपातीपणाने होण्यासाठी निवडणूक महामंडळाची पुनर्रचना करण्यात यावी. निवडणूक महामंडळात एकाऐवजी तीन सदस्य असावेत. मत मोजणी मतदान केंद्रातच केली जावी.
मतदान कोणी केले हे न कळण्यासाठी सध्याची काउंटर फाइल ठेवण्याची पद्धत रद्द करून त्याऐवजी मतदान पत्रिका पंच करण्याची पद्धत सुरू करावी. या सूचनांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी इतर विरोधी पक्षांचे सहकार्य घेणार आहे.
वरील सूचनांचा अवलंब न केल्यास भारतातनिःपक्षपातीपणाने निवडणुका होणार नाहीत, असे बलराज मोधक म्हणाले.
“भारत के शहीद’ करमणूक कर मुक्त
मुंबई – महाराष्ट्र शासनाने “भारत के शहीद’ या हिंदी चित्रपटाच्या खेळांना काही अटींवर सर्व राज्यभर करमणूक कर त्वरित माफ केला आहे.