नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेत काँग्रेसने सरकारवरसडकून टीका केली आहे. देशातील महागाई आणि कोरोना कार्यकालातील कामगिरी लक्षात घेता हे गेल्या 73 वर्षांच्या इतिहासातील सर्वात दुर्बल सरकार आहे असं कांग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.
Hate is the weapon of the weak & the Modi govt has been wielding it for 7 years straight. #7yearsOfModiMadeDisaster pic.twitter.com/gfsnXnA6AB
— Congress (@INCIndia) May 30, 2021
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, “देशाला एका बिनकामी आणि दुर्बल सरकारचं ओझं वाहताना आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे परिणाम देश भोगतोय कारण या सात वर्षाच्या कालावधीत बेरोजगारी 11.3 टक्क्यांनी वाढलीय. अनेक भागात पेट्रोल 100 रुपयांवर गेलं आहे तर खाद्य तेलाच्या किंमती 200 रुपयांवर गेल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे गेल्या 73 वर्षाच्या इतिहासाती सर्वात दुर्बल सरकार आहे.”
The second wave of coronavirus has hit our nation like a ton bricks. The reason? Because the Modi govt wasted time, underprepared & was too arrogant to understand how the virus works. #7yearsOfModiMadeDisaster pic.twitter.com/MsKlCteRJf
— Congress (@INCIndia) May 30, 2021
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घातला असताना याला जबाबदार केवळ मोदीच असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या काळात मोदींनी इतरांच ऐकलं नाही, वेळ घालवला त्यामुळे देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं नुकसान सहन करावं लागलं असं काँग्रेसनं म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीत केवळ तिरस्कार पसरवला असाही आरोप त्यांनी केला.