मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवला होता. मात्र, सध्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. राज्यात आज 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 424 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.
आजपर्यंत एकूण 53,07,874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.24 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,43,50,186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,92,920 (16.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,54,976 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 16,078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे शहरात अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार –
पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.