नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. करोनाची दुसऱ्या लाटेत उशिरा उपाययोजना केल्याने देशाला त्याची किंमत मोजावी लागली असा निशाणा ते वारंवार साधत आहेत. आजही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
लाशों पर राजनीति, @INCIndia स्टाइल !
पेड़ों पर से गिद्ध भले ही लुप्त हो रहे हों, लेकिन लगता है उनकी ऊर्जा धरती के गिद्धों में समाहित हो रही है।@RahulGandhi जी को #Delhi से अधिक #NewYork पर भरोसा है।
लाशों पर राजनीति करना कोई धरती के गिद्धों से सीखे।@PMOIndia @BJP4India https://t.co/29D0yWU5wS
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 26, 2021
केंद्र सरकारवर करोनासंदर्भातील आकडेवारीवरुन टीका केली होती. अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलतं असा टोला लगावला होता. न्यू यॉर्कमधील या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले करोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. यावर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं आहे.
हर्ष वर्धन यांनी ट्विट केले आहे की, “ मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेस पक्षाची स्टाइल आहे. सध्या झाडांवरील गिधाडं दिसत नसले तरी, त्यांच्यातील ऊर्जा जमीनीवरील गिधडांमध्ये नक्कीच आली आहे. त्यांच्या ट्विटवरून असे लक्षात येते कि, त्यांना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधडांकडून शिकावं,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्युही वाढले. अजूनही देशात ४ हजारांवर रुग्णांचा मृत्यू होतायेत. केंद्रीय आरोग्यमंत्रालायने आज सकाळी गेल्या २४ तासांतील दिलेल्या माहितीनुसार देशात ४१५७ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्युंवरून आता राजकारण सुरू झालं आहे.