रेडा(प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे हक्काचे पाणी मिळते ते पाणी इंदापूर तालुक्यातील शेतकरी कधीही पळवणार नाहीत.परंतु ज्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्याचा हक्क नाही ते पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला मिळाले असताना,चुकीचा विरोध करून पाणी रोखले आहे,व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संसारात विष कालण्याचे काम सोलापूरच्या काही स्वार्थी लोकांनी केले आहे.त्यांना उजनी धरणातून बेकायदेशीर एक पाण्यांचा थेंब देखील शेतकरी जाऊ देणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिला.
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी इंदापूर – बारामती रस्त्यावर तरंगवाडी येथे काळ्या पट्ट्या बांधून रस्ता रोको करत सोलापूरच्या त्या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे बोलत होते.यावेळी लक्ष्मण झगडे,डॉ.दादाराम झगडे,विजय झगडे तुकाराम अभंग, सचिन अभंग,नीरज झगडे,गणेश झगडे, तुकाराम करे,बजरंग राऊत,राजाराम तरंगे,माऊली शिंदे, गोखळी चे सरपंच बापू पोळ,उपसरपंच सचिन तरंगे, तरंगवाडी चे उपसरपंच आप्पा शिंदे,सरपंच कांतीलाल बुनगे,बापू पारेकर,शिवराज गावडे,आजिनाथ तरंगे, अण्णा शेंडगे,कांतीलाल तरंगे यांच्यासह शेतकरी या आंदोलनात सामील झाले होते.
पुढे बोलताना कार्याध्यक्ष अतुल झगडे म्हणाले की,जोपर्यंत इंदापूर तालुक्याला हक्काचे दिलेले पाच टीएमसी पाणी कायमचे मिळत नाही.तोपर्यंत संघर्ष व लढाई बंद करणार नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कदापि वाऱ्यावर सोडणार नाहीत.त्यामुळे चुकीचा झालेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे अशीही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.
स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ शेतकर्यांना आली आहे,इंदापूर तालुक्याला जे पाच टीएमसी उचल पाणी मिळणार होते.हे पाणी मिळण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली होती.हि मान्यता जलसंपदामंत्री व संबंधित विभागाने रद्द केलेली आहे.खऱ्या अर्थाने हा लढा शेतीसाठी आहे जर अनेक वर्ष पाण्यावाचून वाट पाहत असणारी शेती अजूनही कोरडीच राहणार असेल तर शेतकर्याने जगायचे कसे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केला आहे.
सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासनाकडे शर्थीचे प्रयत्न करून बावीस गावांसह 60 गावे कायम हिरवीगार राहतील. यासाठी योजना अस्तित्वात आणली होती.योजनेमुळे तालुका पाण्याच्या संबंधात स्वयंपूर्ण होणार होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी आणण्याचा निर्णय झालेला होता.मात्र सोलापूर करांनी चुकीचा विरोध केला, त्यामुळे ही योजना थांबली आहे.शेतकरी प्रचंड अडचणीत या निर्णयामुळे गेलेला आहे.त्यामुळे जो निर्णय पाच टीएमसी पाणी देण्याचा झालेला होता तो पूर्ववत करावा अशी मागणी तमाम शेतकरी बंधूंची आहे अशीही माहिती कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.