करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध प्रकारचे उपाय वापरले जात आहेत. काहीजण दिवसातून अनेक वेळा काढा घेतात तर काहीजण पुन्हा पुन्हा गरम पाणी पितात. का ? तर या उपायांनी म्हणे करोना विषाणू मरतो. या व्यतिरिक्त अशाच प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत, त्याद्वारे असा दावा केला जात आहे की त्या उपायांचा वापर केल्यास तुम्हाला कोरोना संक्रमणापासून पूर्णपणे सुरक्षा मिळेल. असाच एक दावा सोशल मीडियावर व्हायरल आहे की तुम्ही जर दररोज गरम पाण्याने आंघोळ केली तर हा उपाय कोरोना विषाणू नष्ट करण्यात प्रभावी ठरू शकतो. चला तर मग, तज्ञांकडूनच जाणून घेऊया की हा उपाय संसर्ग रोखण्यासाठी खरोखर प्रभावी ठरू शकतो?
काय सांगत आहेत सोशल मीडियावर उपाय ?
सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की गरम पाण्याने आंघोळ केल्याने आणि गरम पाणी वारंवार प्याल्याने कोविड संसर्गाचा धोका टाळता येतो. व्हायरलच्या सूचनेत असे म्हटले जात आहे की कोरोना विषाणू गरम पाण्याच्या परिणामामुळे नष्ट होतो, म्हणून जेव्हा जेव्हा आपण बाहेरून घरात जाता तेव्हा गरम पाण्याने आंघोळ करा.
तज्ञ यावर काय म्हणतात?
या व्हायरल सूचनेबद्दल केंद्र सरकारने लोकांना इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या ट्विटर हँडल ‘माय गव्हर्नमेंट इंडिया’ च्या माध्यमातून तज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले की कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी असे उपाय पुरेसे नाहीत. कोरोना विषाणू गरम पाणी पिऊन किंवा आंघोळीने मारला जाऊ शकत नाही किंवा कोविड रोग बरा होऊ शकत नाही. कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी लॅब सेटिंग्जमध्ये 60-75 डिग्री तापमान आवश्यक असते.
मग गरम पाण्याचा काय फायदा?
दिल्ली एम्सचे डॉ. आयशी पाल म्हणतात की लोकांनी हलके कोमट पाणी प्यावे. हे पचनासाठी तसेच घसा स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. कोमट पाण्याचे सेवन केल्याने घशातील कफदेखील दूर होतो.
काढ्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये
एम्सचे डॉ. राजीव रंजन स्पष्ट करतात की जास्त प्रमाणात काढा सेवन करणे आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. नैसर्गिक औषधांबाबत असे मानले जाते की औषधे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात, या दृष्टिकोनातून कोरोना टाळण्यासाठी काढ्याच्या वापरावर भर दिला जात आहे. मात्र, एका दिवसात एका कपपेक्षा जास्त काढा घेऊ नये.