संजय लीला भन्साळीनी “इन्शाअल्लाह’साठी सलमान खान आणि आलिया भट या दोघांना साइन केले होते. सलमान हा आलियापेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे ही जोडी अनेकांना खटकली होती. मात्र, संजय लिला भन्साळींना एक मॅच्युअर लव स्टोरी करायची असल्यामुळे ही जोडी परफेक्ट होती, असे त्यांना वाटले.
मात्र, सलमानने अचानक या सिनेमातून नाव मागे घेतले, त्यामुळे संजय लीला भन्साळी यांना हा सिनेमा बंद करावा लागला होता. सलमान बाहेर पडल्यावर शाहरुख खानला “इन्शाअल्लाह’साठी साइन करण्याचा विचार सुरू असल्याचे समोर आले.
त्याची अधिकृत घोषणा काही झाली नाही. मात्र, आता तर शाहरुख खाननेही “इन्शाअल्लाह’ न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. त्याच्या जागेवर ऋतिक रोशनला विचारण्यात आले आहे. मात्र त्याने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.