मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच मागील २४ तासात तर कोरोनाचा उद्रेकच झाल्याचे दिसत आहे. कारण कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आज राज्यात 23,179 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 84 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मत्यूदर 2.24% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,78,35,495 प्रयोगशाळा नमनुयाांपैकी 23,70,507 (13.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण 1,52,760 अॅक्टिव रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांची हीच संख्या मंगळवारी दिवसभरात एकूण 21,63,391 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 91.26 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्येचा आकडा पाहता लॉकडाऊनचे सावट गडद होताना दिसत आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 24,492 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 15,051 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ पंजाबमध्ये 1,818 तर केरळमध्ये 1,054 नवीन रुग्ण आढळले आहेत.