लखनौ – आगरा येथे कंटेनर-स्काॅर्पिओच्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आगरा-कानपुर राष्ट्रीय महामार्गावर आज (ता. 11) झाला. स्काॅर्पिओ चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी डिवाईडरला धडकून विरूद्ध दिशेला जाणाऱ्या कंटेनरला धडकली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. स्काॅर्पिओतील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी गया जिल्ह्यातील डुमरिया येथील 6 तरूण हे यावर्षीची दहावीची परीक्षा देऊन हरियाणातील सिरसा येथे काम शोधण्यासाठी जात होते.
आगराचे एसपी बबलू कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्काॅर्पिओ आणि कंटेनरची धडक झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. काहीजण गंभीर जखमी आहेत. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.