कोल्हापूर – शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मोठी गमंत आहे. शेतकऱ्यांना सरकारचे मत एकायच नाही, शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी, असा प्रकार सुरू आहे. सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला तयार असताना शेतकऱ्यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे.
त्यांना प्रश्न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका दिल्लीतील आंदोलनावर राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
सत्तर दिवस आंदोलन सुरू आहे. सरकारची चर्चेची भूमिका तपासून बघा. सुरुवातीला दिल्लीतील शेतकरी एक मागणी घेऊन गेला. यांच्या अपेक्षा वाढल्या. काही दिवसांनी चार मागण्या घेऊन गेले, त्यातील तीन मागण्या मान्य केल्या.
तरीदेखील विरोध सुरू आहे, याचे गमक कळले नाही, हे आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नाही, राजकीय आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे, असा टोला पाशा पाटील यांनी लगावला.